जग गर्वाचे आगर
जीव जीवाचाच वैरी
संपाया अंधार येथला
उतराव्या सोनसरी
एक दुःख रे सोसती
अन्नासाठी रे धावती
दूजे श्वान रे पोसती
ज्याला लाखाच्या किंमती
माणूस होउनी रे आला
मन उग्र का रे केले
रक्षक म्हणत होतो ज्याला
त्याच्यात भक्षक मी पाहिले
थांबवा विचार असले
जे भेदाचे उद्गाते
माणसाचे माणूसपण
श्रेष्ठ कृतीने समजते
नवे सहकार्याचे वारे
सार्या जगात वाहू दे
प्रगती समतेने सारी
या विश्वात नांदू दे
©अमोल पाटील
(अमोल पाटील लिखित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून)
छान सर
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteNice
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखुप छान कविता..!
ReplyDelete